चोरीला गेलेले, गहाळ झालेले २०३ मोबाईल केले परत
मुंबई : दसऱ्या पूर्वदिनी मुंबईच्या पवई पोलिसांनी २०३ नागरिकांना अनोखी भेट दिली. चोरीला व गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन पोलिसांनी संबंधितांना मोबाईल परत केले.
पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अनेक मोबाईल चोरीला गेले. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली होती. या मोबाईलचा त्वरित शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केल्या. त्यानुसार पवई पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून देशभरातील विविध राज्यांसह महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांतून मोबाईल जप्त केले. तसेच जानेवारी २०२४ पासून मोबाईल चोरणाऱ्या ४० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही उल्लेखनिय कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, एसीपी सूर्यकांत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, अंमलदार गणेश पाटील (गुन्हे), जयदीप गोसावी, S.P. आणि संतोष कांबळे, तानाजी टिळेकर, बाबू येडगे, चव्हाण, आदित्य झेंडे, संदीप सुखखडे, सूर्यकांत शेट्टी,साटम, प्रशांत धुरी, कुंदे यांनी केली.