कल्याणच्या प्रवाशाला लुटणाऱ्यांना कोल्हापुरात केले जेरबंद;
१२ तासांत गुन्ह्याची उकल;
सातारा पोलिसांची जबरदस्त कामगिरी
सातारा : कल्याणच्या प्रवाशाला लुटणाऱ्या गुन्हेगारांना कोल्हापुरात बेड्या ठोकण्यात आल्या. ही जबरदस्त कामगिरी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने अवघ्या १२ तासांत केली.
गुन्ह्याचा तपशील…
११ डिसेंबर २०२४ रोजी सुनिल कुमार गर्जे (वय ३५, रा. कल्याण, ठाणे) यांनी सातारा तालुक्यातील विठ्ठल मंगलम हॉटेलजवळ आपली रोकड आणि मोबाईल फोन लुटल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी पथकाला तपासाचे आदेश दिले. तपासादरम्यान डी. बी. पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयितांना कोल्हापुरातील किणी वाठार येथून ताब्यात घेतले. या दोघांच कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेली रोख रक्कम, मोबाईल फोन जप्त केला. गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. नेवसे करत आहेत.
पोलिसांचा सन्मान
सदर यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी
व्ही. बी. नेवसे सहायक पोलीस निरीक्षक, अनिल मोरडे, सहा. पोलीस निरीक्षक, एस.एस. काटकर सहायक पोलीस निरीक्षक, हवालदार राजू शिखरे, मालोजी चव्हाण, वदा स्वामी, पोलीस नाईक प्रदिप मोहीते, सतिश बाबर, अंमलदार शिवाजी डफळे, संदिप पांडव, धिरज पारडे, संचन झनकर, रोहित बाबस यांचे कौतुक करून पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या.