मुंबई : पोलीस खात्या प्रति असलेली निष्ठा, सन्मान, त्यांना कर्तव्य बजावताना आलेल्या खडतर अडचणी यांची जाण असलेले विष्णू जनाजी धस (वय ६८) हे सध्या पोलिसांचे सारथी म्हणून नावारूपाला आले आहेत. मुंबईत कोठेही खाकी वर्दीवाला अथवा पोलिसाची देहयष्टी असलेली व्यक्ती नजरेस पडताच विष्णूजी रिक्षा (Rickshaw driver Vishnu Dhas) थांबवतात आणि आपुलकीने संबंधितांना विचारून पोलीस ठाणे अथवा घरापर्यंत मोफत सोडतात.
विष्णूजी कुर्ला नेहरूनगर(Kurla Nehru Nagar) परिसरात राहत असून गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून रिक्षा चालवतात. त्यांची पत्नी नंदा यांच्या सोबत सुखाने संसार करताना या दाम्पत्याच्या पोटी दोन मुली व एक मुलगा जन्माला आला. अनेक खडतर प्रसंगांना सामोरे जात तिन्ही मुलांना त्यांनी उच्च शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले. सध्या त्यांची एक मुलगी परदेशात आहे तर इतर दोघे भारतातच कार्यरत आहे.
धस यांच्या संसारात रिक्षाने कायम साथ दिली. त्या काळापासून रिक्षा चालक विष्णू धस यांनी खाकी वर्दीतल्यांसाठी सुरू केलेली सेवा अद्याप सुरूच असून, जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत ही सेवा कायम सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी ‘पोलीस वार्ता’ला सांगितले.
या सेवेसाठी श्री विष्णू धस व सौ नंदा या दाम्पत्याला ‘पोलीस वार्ता’च सलाम! (Salute to rickshaw driver Vishnu Dhas from police varta team)